मुंबईत सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पोलिसांनी काढले आहेत. मुंबईतील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे ५ पेक्षा अधिक लोकांना बेकादेशीरित्या एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे निर्देश काढले आहे. याबाबत त्यांनी एक पत्र जारी केलं आहे. त्यानुसार २८ मे पासून ११ जूनपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी राहतील. शहरातील जनजीवन विस्कळीत करण्याचा, दंगल घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर पाचपेक्षा अधिक जणांना बेकायदेशीरित्या एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असं पत्रात सांगितलं आहे.

Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

यातून लग्नकार्ये, अंत्यसंस्कार, चित्रपटगृहे, नाटक, शाळा, महाविद्यालये, दुकाने, कारखाने आणि विभागीय पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेल्या संमेलनाला आणि मिरवणुकीला सूट देण्यात आली आहे.