मुंबई: मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी  गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी राणा दाम्पत्य सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना महत्त्वाच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ११ नोव्हेंबर रोजीही दोघांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळीही राणा दाम्पत्य न्यायालयात अनुपस्थित राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा