शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अखेर सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) बसविण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) मुहूर्त सापडला असून यासंबंधीचे कार्यादेश संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. महामार्गावर नऊ महिन्यांमध्ये यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यानंतर महिन्याभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. एकूणच वर्षभरात अत्याधुनिक अशी ‘आयटीएमएस’ यंत्रणा कार्यान्वित होऊन वाहतुकीला शिस्त लागेल, वाहनचालकांवर करडी नजर राहील आणि अपघात रोखले जातील असा विश्वास एमएसआरडीसी कडून व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून ९४ किमी लांबीच्या या द्रुतगती मार्गावरून दररोज अंदाजे ६० हजार वाहने धावतात. या मार्गासाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली असून कडक नियमही घालण्यात आले आहे. मात्र वाहनचालकांकडून वेगमर्यादा आणि नियमांचे पालन होत नाही. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी सज्ज यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एमएसआरडीसी’ने येथे अत्याधुनिक अशी ‘आयटीएमएस’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai to pune expressway to be safe within a year soon intelligent management traffic system will be installed mumbai print news msr
First published on: 14-08-2022 at 18:00 IST