मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या उन्हाळी सत्रातील अंतिम वर्षाच्या सत्र ६, सत्र ८ व सत्र १० च्या परीक्षा एप्रिल व मे २०२३ मध्ये घेतल्या होत्या. निकालाभावी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना आणि नोकरी मिळवताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विद्यापीठाने बी.एम.एस, बॅफ, बीबीआय, बीएफएम, बीएस्सी सत्र ६ व विधी शाखा सत्र ६ आणि सत्र १० या सात परीक्षांचे मूल्यांकन पूर्ण केले आहे. सदर परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्य्यात असून निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले.

हेही वाचा >>> म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ :सोडतपूर्व प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर

rte admission process loksatta news
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमामुळे ‘आरटीई’ प्रवेश सोडतीच्या वेळेत बदल
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Candidate sneaks into gate after arriving late at exam centre
परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचली, गेट झाले बंद तरी मानली नाही हार; शेवटी विद्यार्थीनीने काय केले? पाहा, Viral Video
nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?
The quality of school students has deteriorated it is clear from the asar survey Mumbai news
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच! ‘असर’च्या अहवालात शैक्षणिक अधोगतीचा पंचनामा
This years Maharashtra State Board exams include changes in grace marks awarding process
बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय…

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने उन्हाळी सत्रातील परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध लागतात आणि नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने त्यांची धडपड सुरू होते. यामुळे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेळेत होऊन निकाल जाहीर होण्यास उशीर होऊ नये यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे हे सदर प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेऊन आहेत. संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे. तर उन्हाळ्याची सुट्टी असतानाही शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम सत्र परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले असून, सदर परीक्षेमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ४ जुलैपासून सुरू होत आहे.

Story img Loader