लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत थंडीची चाहूल लागली होती. मात्र, त्यानंतर आलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली. ऐन डिसेंबर महिन्यात मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या असून मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Over 2400 people died in extreme weather events like floods heatwaves and landslides
हवामान प्रकोपाचे गतवर्षांत देशात २४०० बळी, जाणून घ्या, उष्णतेच्या झळांची स्थिती काय
last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?
Mumbai temperature, drop in temperature,
मुंबई : तापमानात घट होण्याची शक्यता
mumbai heat loksatta news
मुंबई : उकाड्यात वाढ

बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील वातावरणावरही झाला आहे. काही दिवसांपूर्वी थंडीची चाहूल लागली होती. उपनगरांतील किमान तापमान नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून २० अंशाखाली नोंदले जात होते. यामुळे रात्री, तसेच पहाटे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईत पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. तसेच वातावरण ढगाळ आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी २४.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

आणखी वाचा-राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची लवकरच तपासणी करणार

दरम्यान, डिसेंबर महिन्यात देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

चक्रीवादळाचा परिणाम

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे थंडीत घट झाली आहे. या चक्रीवादळाचा एकूणच वातावरणावर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यात तापमानातील वाढ कायम राहून काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. मुंबईत मात्र संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मात्र, पाऊस पडणार नाही, असे हवामान विभगाकडून सांगण्यात आले.

Story img Loader