लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सर्व अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर गेले पाहिजे. त्यामुळे अडीअडचणींची जाणीव होऊन त्यावर योग्य तो तोडगा निघू शकेल. केवळ कार्यालयात बसून समस्यांचे निराकरण करणे शक्य होत नाही. माहिती तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी प्रत्यक्षस्थळी जाऊन काम करण्यास पर्याय नाही. जे अभियंता नागरिक, लोकप्रतिनिधीसमवेत संवांद साधतात, त्यांना कमी समस्यांना समोर जावे लागते. जे अभियंता तोंडदेखले जातात, त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागते. त्यामुळे सर्वांनी संवाद साधण्याची कला वृद्धिंगत करावी, अशा शब्दात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका अभियंत्यांची कान उघाडणी केली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Tax revenue is vital for civic services and property tax ensures
करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न गरजेचे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची सूचना
UGC, recruit professors, Instructions UGC,
आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस नकार; प्रचलित नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्याच्या ‘यूजीसी’च्या सूचना
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक, पाणीपुरवठा, इमारत परिरक्षण, नगर अभियंता, वास्तुविशारद, इमारत प्रस्ताव, पर्जन्य जलवाहिन्या विभागातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहायक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आणखी वाचा-मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिका सज्ज

मुंबई महानगरपालिकेचे अभियंते तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत. रस्ते, पाणी, वीज, घनकचरा व्यवस्थापन, पर्जन्य जलवाहिन्या या पायाभूत सुविधांमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलला आहे. याचे श्रेय अभियंत्यांना दिले पाहिजे. मात्र, अभियंत्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम केल्यास, नागरिकांशी सुसंवाद साधल्यास अनेक समस्यांवर मात करता येईल आणि समस्यांचे निराकरण सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.

भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील सभागृहात झालेल्या या संवाद मेळ्यास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-मासळी विक्रेत्या महिल्यांच्या शौचालयावर पालिकेचा हातोडा

ढिसाळ कारभार खपवून घेतला जाणार नाही…

महानगरपालिकेचे सुमारे चार हजार अभियंते मुंबईतील दोन कोटी नागरिकांच्या जीवनास स्पर्श करीत आहेत. मुंबईकर नागरिकांच्या कररूपी पैशांची बचत करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. ऐसपैस अंदाजपत्रक तयार करणे, सल्लागारांवर विसंबून राहणे कटाक्षाने टाळले पाहिजे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कोणताही ढिसाळ कारभार खपवून घेतला जाणार नाही. अभियंत्यांनी तारतम्य बाळगायला हवे. विकासकामे दर्जेदार, ठरवलेल्या वेळेत आणि मंजूर अंदाजपत्रकानुसारच झाली पाहिजेत, असा इशाराही गगराणी यांनी यावेळी दिला.

Story img Loader