मुंबई: ‘जे लोक कधीही विमानात बसले नाहीत. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले,’ असे वक्तव्य शिवसेनेचे (शिंदे) गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. विमानातून परत आणले म्हणजे काय लोकांवर उपकार केले का? असा संतप्त सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
पहलगाम हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटक ठार झाले. काश्मीरच्या विविध भागांत अडकलेल्या पर्यटकांना माघारी आणण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने काश्मीरला पाठविले. असे असताना बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशेष विमानाने काश्मीरला गेले. यातून सरकारमधील विसंवादाची चर्चा होत म्हस्के यांच्या विधानाने वाद वाढला आहे. संकटकाळात कोल्हापूर, केरळ, ईशाळवाडी येथे शिंदे सर्वांत आधी पोहोचले होते याची आठवणही म्हस्के यांनी करून दिली.
पहलगामला गेलेल्यांत ४५ पर्यटक हे गरीब होते. ते रेल्वेने गेले होते, त्यांची खाण्याची पंचाईत होती. त्यांना शिंदे यांनी विमानातून सुखरूप परत आणले. – नरेश म्हस्के, खासदार ठाणे</strong>
देश शोकसागरात बुडालेला असताना नरेश म्हस्के यांचे वकत्व्य हे सत्तेचा उन्माद दर्शविणारे आहे.- सुषमा अंधारे, शिवसेना नेत्या