काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तमिळनाडूप्रमाणेच महाराष्ट्रातही वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा मोडीत काढून पूर्वीप्रमाणेच राज्य मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेतील गुणांवर हे प्रवेश देण्यात यावेत, अशी भूमिका राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने घेतली आहे. ग्रामीण भागातील व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घ्यावा, अशी विनंती करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले आहे.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
10 th Exam
दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण…
Fee waiver students
दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या किती विद्यार्थ्यांना शुल्कमाफी?

नीटमध्ये सीबीएससी व इतर केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांची संख्या ही राज्य परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाढत असल्याचे समोर आले आहे. महागड्या खासगी शिकवण्या लावणे गरीब विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. परिणामी ग्रामीण व सामान्य कु टुंबांतील विद्यार्थी डॉक्टर होण्यापासून वंचित रहात आहेत. शिक्षणातील ही असमानता दूर करण्यासाठी नीट परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे राज्य मंडळाच्या परीक्षेतील गुणांवर आधारित वैद्यकीय प्रवेश सुरू करावेत, अशी त्यांनी मागणी के ली.

गृहनिर्माण संस्थांमध्ये महिला सुरक्षारक्षक असावेत 

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना हा चितेंचा विषय आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शहरांतील गृहनिर्माण संस्थांमध्ये पुरुष सुरक्षारक्षकांबरोबर महिला सुरक्षारक्षक ही असावेत, अशी मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली असल्याचे पटोले यांनी सांगितले.