धरणांत फक्त ३७ टक्के पाणीसाठा, जून-जुलैच्या पावसावर पाणीपुरवठय़ाची मदार

Water Shortage in Mumbai ऑक्टोबरपर्यंत पाऊस होऊनही यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत खालावला आहे.

Ujani Dam
धरणांत फक्त ३७ टक्के पाणीसाठा (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

मुंबई : ऑक्टोबरपर्यंत पाऊस होऊनही यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत खालावला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सध्या ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून व जुलैमध्ये पाऊस किती पडतो यावर पाणीपुरवठय़ाचे नियोजन ठरणार आहे. पावसाचे आगमन लांबल्यास मात्र पाणी कपातीची वेळ मुंबईवर येऊ शकेल. उन्हाचा ताप हळूहळू वाढू लागला आहे. 

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

एप्रिल महिना जवळ आला की मुंबईकरांनाही पाणी कपातीची चिंता भेडसावू लागते. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला व मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली होती. ऑक्टोबररच्या अखेरीस धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली असे वाटत होते. मात्र अद्याप एप्रिल महिना सुरूही झालेला नसताना धरणांतील पाणीसाठा ३७ टक्क्यांवर आला आहे. उन्हाळय़ाचे दोन महिने व पुरेसा पाऊस सुरू होईपर्यंतचे दोन महिने असे चार महिने याच पाणीसाठय़ावर मुंबईकरांची मदार असणार आहे.

हेही वाचा >>> मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे शुक्रवारपासून महिनाभर टंचाई; ठाण्यालाही फटका

गेल्या वर्षी याच वेळी ४० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.  ऊध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणांतून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सातही तलावांतील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटरवर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. तसेच तलावांतील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल या दृष्टीने पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे नियोजन केले जाते. सर्व तलाव १ ऑक्टोबररला पूर्ण क्षमतेने भरले असले तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो. तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत तर पाणी कपात करण्याची वेळ येते. या वर्षी अजून तरी पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून व जुलैमध्ये किती पाऊस पडतो त्यावर मुंबईच्या पाणीपुरवठय़ाचे भविष्य असेल.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 00:52 IST
Next Story
‘कॅग’ अहवालातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी!, आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांची मागणी
Exit mobile version