मुंबई : मागील काही दिवसांत अवयवदान मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून या वर्षातील तिसरे अवयवदान गुरुवारी झाले आहे. ४५ वर्षीय मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी संमती दिल्यामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले आहे. आठ दिवसांत शहरात तीन रुग्णांचे मरणोत्तर अवयवदान केले आहे.

४५ वर्षीय रुग्णांचा मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. मृत्यूनंतर अवयवदान करण्याची या रुग्णाची अंतिम इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाईकांनी अवयवदान करण्यास संमती दिली. रुग्णांचे मूत्र्रंपड, यकृत, हृदय आणि नेत्रपटल दान करण्यात आले. यातील एक मूत्र्रंपड आणि हृदय रुग्णांचा मृत्यू झालेल्या एच.एन.रिलायन्स रुग्णालयाला देण्यात आले. तर दुसरे मूत्र्रंपड अपोलो रुग्णालयातील आणि यकृत ग्लोबल रुग्णालयातील रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले गेले. नेत्रपटल बचुभाई नेत्रपेढीला दिले आहे. अवयवदान करण्याची इच्छा असल्यामुळे रुग्णाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. अवयवांच्या रूपाने रुग्ण पुन्हा नवीन जीवन जगणार असून या कृतीने नवे प्रोत्साहन कुटुंबाला दिल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे. दुसरे अवयवदान २३ जानेवारीला झाले असून यामध्ये ५३ वर्षीय रुग्णाचा मेंदूमृत झाल्यानंतर नातेवाईकांनी अवयवदान करण्यास संमती दिली होती. या रुग्णांचे यकृत आणि मूत्र्रंपड दान करण्यात आले.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
Venus And Sun Yuti
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश
Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment
बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?