मुंबई : कुर्ला येथील इमारत पडून झालेल्या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा विषय ऐरणीवर आला असून अद्याप १८७ धोकादायक इमारती रिकाम्या झालेल्या नाहीत. मुंबईतील एकूण ३३७ खासगी धोकादायक इमारतींपैकी २९ इमारती पाडून टाकण्यात पालिकेला यश आले असून ३०८ इमारती अजूनही उभ्या आहेत. त्यापैकी १८७ इमारतींमध्ये अजूनही नागरिकांचे वास्तव्य आहे. तर १३२ इमारतींची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. या इमारतींमधून शेकडो नागरिक जीव धोक्यात घालून राहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने पावसाळय़ापूर्वी मुंबईतील खासगी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले. शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे अशा इमारती सी-वन या प्रकारात अर्थात अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. यंदाच्या सर्वेक्षणात मुंबईत ३३७ इमारती धोकादायक आढळल्या होत्या. गेल्या वर्षी मुंबईत ४६२ इमारती धोकादायक होत्या. त्यापैकी गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत १३६ इमारती पाडून टाकण्यात पालिकेला यश आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People in mumbai are living in 187 dangerous condition buildings zws
First published on: 30-06-2022 at 00:10 IST