मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने राष्ट्रीय हरित लवादापुढे सुनावणी होऊ शकत नाही, हा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लवादापुढील याचिका मागे घेतली आहे.
सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्यावर नाक घासून माफी मागण्याची वेळ येईल, अशी टिप्पणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब यांनी केली, तर परब यांचा गैरव्यवहार सिद्ध झाल्याने माघारीचा प्रश्नच नसल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका सोमय्या यांनी हरित लवादापुढे दाखल केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याने परब यांचे मित्र आणि रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे लवादापुढे सुनावणी होऊ शकत नसल्याचा मुद्दा कदम यांनी उपस्थित केल्याने सोमय्या यांनी याचिका मागे घेतली. त्याचबरोबर सरकारनेच रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिल्याने याचिकेतील मागणीची पूर्तता झाली असल्याचे हरित लवादाच्या आदेशात नमूद केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petition against anil parab withdrawn by kirit somayyas amy
First published on: 30-05-2023 at 01:50 IST