मुंबई, पुणे, पिंपची चिंचवड, नवी मुंबई, ठाणे येथील खासगी कंपन्यांनी शक्य असेल तेवढ्या रुग्णांना Work From Home अर्थात घरुन काम करण्याचा पर्याय द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोना व्हायरसचा फटका खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्याला बसलेला नाही. मात्र हे संकट हे उंबरठ्यावरुनच परत जावं यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करतो आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.