मुंबई : ब्रिचकँडीमधील रहिवाशांनी विरोध केला म्हणून कोट्यवधी रुपये खर्चाचा वाहनतळ प्रकल्प रद्द करणाऱ्या मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दादरच्या शिवाजी पार्कमधील रहिवाशांनी जाब विचारला आहे. शिवाजी पार्क मैदानातील धुळीचा प्रश्न सोडवण्यासाठी गेली आठ वर्षे आंदोलने करूनही मुंबई महापालिका त्यावर उपायजोजना का करीत नाही, असा सवाल येथील आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

सागरी किनारा मार्ग प्रकल्पांतर्गत ब्रिच कँडी येथे भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार होते. त्याकरिता खोदकामही करण्यात आले होते. मात्र येथील रहिवाशांनी केलेल्या विरोधानंतर हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने रद्द केला. कोट्यावधी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पालिकेने भुर्दंड सोसून रद्द केला. मात्र या निर्णयाचे आता पडसाद उमटू लागले आहेत. शिवाजी पार्क येथील रहिवाशांनी या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.

Shatrughan Sinha on non-vegetarian food ban
Shatrughan Sinha: ‘संपूर्ण देशात मांसाहारावर बंदी घाला’, शत्रुघ्न सिन्हांच्या मागणीमुळे तृणमूल काँग्रेस अडचणीत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
boricha marg Encroachment free news
मुंबई : चिंचपोकळी परिसरातील बोरीचा मार्ग अतिक्रमण मुक्त, पालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई
शिवाजी पार्क मैदानात धूळ नियंत्रणासाठी गवताची लागवड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश
Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
thane municipal corporation plans to replant 2097 trees at headquarters after criticism of cutting 631 trees
पालिका इमारतीमुळे बधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण परिसरातच, ठाणे महापालिका प्रशासनाचा विचार
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी

हेही वाचा >>>Shah Rukh Khan’s house recced: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं शाहरुख खानच्या घराचीही केली होती रेकी, पोलिसांची माहिती

शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीच्या धुळीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. मैदानातील माती काढण्याची रहिवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरील या मैदानातून उडणाऱ्या धुळीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. धुळीची समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत रहिवाशांनी अनेकदा पालिकेकडे पाठपुरावा केला, आंदोलन केले. मात्र गेल्या कित्येक वर्षात या समस्येवर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे ब्रिचकँडीच्या रहिवाशांनी आंदोलन केल्यावर तातडीने निर्णय घेणारे महापालिका प्रशासन शिवाजी पार्कच्या धुळीच्या प्रश्नावर मात्र वेळकाढूपणा करत असेल्याचा आरोप येथील रहिवाशानी केली आहे.सध्या या मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा सराव सुरु आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याचा आरोपही रहिवाशांच्या प्रतिनिधिनी केला आहे.

हेही वाचा >>>अभिनेता सैफ अली खानवर हल्ला: एक संशयीताला ताब्यात

श्रीमंतांसाठीच महापालिका

या प्रश्नावर आंदोलन करणारे शिवाजी पार्कचे रहिवासी प्रकाश बेलवडे म्हणाले की, शिवाजी पार्कचे मराठी रहिवासी गेली आठ वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पण पालिका प्रशासन त्यावर काहीही करत नाही. मात्र ब्रिचकँडीच्या अमराठी रहिवाशांसाठी प्रकल्प रद्द केला. महापालिका ही श्रीमंतसाठीच काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी अधिकाऱ्यांसोबत शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली होती. शिवाजी पार्क मैदानावर उडणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या त्रासाची पाहणी कदम यांनी केली होती. त्यानंतर शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या प्रश्नाबाबत पंधरा दिवसात महानगरपालिकेने तातडीने निर्णय घेऊन कार्यवाहीला सुरुवात करावी असे निर्देशही कदम यांनी महानगरपालिकेला दिले आहेत.

Story img Loader