Dasara Melava 2022 latest news: मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा ‘दसरा मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, त्यांनी एक जुना प्रसंग सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे मेले तरी चालतील, असं उद्धव ठाकरे यांचं वास्तव आहे, असं रामदास कदम म्हणाले.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात रामदास कदम
पण यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता शंभूराज देसाई यांना उद्धव ठाकरेंचा फोन आला. एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा देऊ नका, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एकनाथ शिंदे
पुढे ते म्हणाले की, शिवसेनेचा कोणताही कार्यकर्ता मोठा झालेला उद्धव ठाकरेंना आवडत नाही. एखादा कार्यकर्ता मोठा होतोय, असं वाटलं की, त्याला संपवून टाकायचं, ही उद्धव ठाकरेंची नीति आहे. उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांचाही जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता. ही बाब किती लोकांना माहीत आहे? मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. दिघेसाहेब माझे मित्र होते, असंही रामदास कदम म्हणाले.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam on uddhav thackeray bkc dasara melava eknath shinde rmm