स्वातंत्र्यानंतर भारतावर अनेक मोठे दहशतवादी हल्ले झाले. मुंबईवर झालेला २६/११चा दहशतवादी हल्ला हा याच मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादी यांच्यात जवळपास ६० तास ही झुंज चालली. फ़िदायिन हल्लेखोराला जिवंत पकडणे हे मुंबई पोलिसांचं मोठं यश असून अशा हल्लेखोराला पकडणे ही जगातील पहिली घटना होती असं या हल्ल्याचा तपास करणारे अधिकारी रमेश महाले यांनी म्हटलंय. या हल्ल्याचा तपास करताना आलेला अनुभव तपास अधिकारी रमेश महाले यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितला.

२६/११च्या या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोकांना आपला प्राण गमवावा लागला तर ३०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. यात अनेक विदेशी नागरिकांचाही समावेश होता. मुंबईवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांचे सर्वच भागातून कौतुक देखील करण्यात आले. या हल्ल्यात जिवंत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला अखेरीस २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आलं.

us report on manipur
“मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन”, अमेरिकेने भारत सरकारला दाखवला आरसा; बीबीसीवरील छापेमारीसह राहुल गांधींचाही उल्लेख
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
israeli air strike destroys iranian consulate in syria
सिरीयातील इराणच्या दूतावासावर इस्रायलचा हवाई हल्ला; किमान ६ ठार झाल्याचा युद्धविरोधी संस्थेचा दावा