मुंबई : देशातील वाढत्या जातीय अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी व पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी दलित पँथर या लढाऊ संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली. 

साधारणत: सत्तरच्या दशकात देशात व महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार वाढल्यानंतर दलित साहित्यिकांनी एकत्र येऊन ९ जुलै १९७२ रोजी दलित पँथर या लढाऊ संघटनेची स्थापना के ली.  गावागावात संघटनेच्या छावण्या उभारल्या गेल्या. मात्र काही वर्षांतच राजा ढाले यांनी दलित पँथर संघटना बरखास्त के ली, परंतु भारतीय दलित पँथर नावाने पुन्हा आम्ही ती संघटना कार्यरत ठेवली, असे आठवले यांनी सांगितले.

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

१९८९-९० च्या दरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी भारतीय दलित पँथर ही संघटनाही बरखास्त करावी लागली. पुढील वर्षी ९ जुलै २०२२ रोजी दलित पँथरच्या स्थापनेला ५० वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने दलित पँथर या लढाऊ संघटनेची स्थापना करावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार या संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली. दलित पँथर कु णावर अन्याय करणार नाही, परंतु अन्यायाचा प्रतिकार करून पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करील, असे त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन ऐक्याबद्दल निराशा

रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी एकत्र यावे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहे, परंतु प्रकाश आंबेडकर यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ऐक्य होत नाही, असा निराशेचा सूर रामदास आठवले यांनी लावला. रिपब्लिकन ऐक्य होत असेल तर, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपली तयारी आहे, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.