मुंबई: ‘एकमेकांचे राजकीय विचार वेगवेगळे असू शकतात. राजकीय पक्षांत मतभिन्नता असू शकते. विधिमंडळात यावर चर्चा होऊ शकते. मात्र विधिमंडळाच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधक हे सारे विसरून एकमेकांसोबत चहा घेत असत. ही महाराष्ट्राची पंरपरा आहे. मात्र अलीकडील काळात यामध्ये फरक पडला आहे. महाराष्ट्राचे विधिमंडळ फार अडचणीच्या काळातून वाटचाल करीत असून, विधिमंडळाचा दुरुपयोग होत आहे, अशी खंत शिवसेना उद्धव बाळासाहेत ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या विधान परिषदेतील भाषणांच्या ‘अभिनंदन.. अभिवादन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात जाधव बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित होते.

What Amit Shah Said About Uddhav Thackeray And Sharad Pawar?
अमित शाह यांचा प्रहार! “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस असे अर्धवट..”
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड
giving tickets to ministers children relatives not dynastic politics siddaramaiah
काँग्रेसच्या उमेदवार याद्यांवर घराणेशाहीचे आरोप? सिद्धरामय्या म्हणतात, “मतदारांचा कल, कार्यकर्ते-नेत्यांच्या शिफारशी…!”
pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार

विधिमंडळाचा वापर वैयक्तिक अडचणी मांडण्यासाठी करायचा नसतो. तर राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो. विधिमंडळाचे काम नियमाला धरून होत नाही. कोणीही उठते आणि मनाला येईल तसे वागते. एखादा मंत्री सभागृहात येतो. तात्काळ घोषणा करतो. लगेच चौकशी लावली जाते. अशाप्रकारे दुरुपयोग केला जात आहे, असेही जाधव म्हणाले. आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.