अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जप्रकरणात अटक झाल्यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. ड्रग्जप्रकरणाने नंतर वेगळंच वळण घेतलं आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात वैयक्तिक मुद्यांवरून सुरू झालेले वाद चांगलेच गाजले. दोघांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि कालांतराने यात दोघांच्या कुटुंबीयांचा देखील समावेश झाला. त्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. दरम्यान, ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा एकदा नव्याने नवाब मलिकांवर मानहानीचा दावा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाच्या आश्वासनानंतरही मंत्री नवाब मलिक हे त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत आहेत, असा दावा केलाय. या वेळी याचिकेत मलिक यांनी २८ डिसेंबर २०२१, २ जानेवारी आणि ३ जानेवारी २०२२ रोजी केलेल्या तीन वक्तव्यांचा उल्लेख आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhedes father files fresh petition in bombay hc against nawab malik hrc
First published on: 20-01-2022 at 09:51 IST