मुंबई : महसूल विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींचा निपटारा कालबद्ध कार्यक्रम आखून केला जाणार आहे. यामुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सर्व सेवाविषयक अडचणी दूर होणार आहेत. यासाठी १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट निवडसूची वर्ष निर्धारित केले असून कोणत्याही अधिकारी-कर्मचारी याची विभागीय चौकशी सहा महिने इतक्या कालावधीत पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे.

राज्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा महसूल विभाग आहे. मात्र या विभागात काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांच्या सेवाविषयक समस्या गुंता वाढलेला आहे. यावर तोडगा काढताना महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी एक सूत्रबद्ध कार्यक्रमाची आखणी केली आहे.  निवडसूची वर्ष जाहीर करून दरवर्षी त्या कालावधीत पदोन्नती ते नियुक्ती या दरम्यानच्या सर्व सेवाविषयक प्रक्रिया एका विशिष्ठ वेळेत पूर्ण करण्याचा तक्ता प्रसिद्ध केला आहे. याचबरोबर विभागीय चौकशीच्या नावाखाली यापुढे वेळकाढुपणा चालणार नाही. कोणतीही विभागीय चौकशी केवळ सहा महिन्यांत पुर्ण करावी लागणार आहे. याचा महसूल विभागातील सर्व अधिकारीऱ्यांना फायदा होणार आहे.  पदोन्नतीसाठीच्या याद्या मागवणे, सेवा ज्येष्ठता याद्या तयार करणे, गोपनीय अहवाल मागवणे यांसारख्या सर्व बाबी एका कालबद्ध पद्धतीने पूर्ण केल्या जाणार आहेत. यात कोणाला चालढकल करता येणार नाही. अशा प्रकारे केलेल्या आखणीमुळे नियमित बदल्या करतेवेळी सुसूत्रता येणार आहे.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
mla dadarao keche bjp martahi news
मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

प्रादेशिक स्तरावर विशेष मोहीम राबवून ३० एप्रिल २०२३ पर्यंत पद नियमितीकरण. सेवा पुस्तिका अद्यायावत करणे, वेतन निश्चिती करणे आदी सेवाविषयक प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत.