Dasara Melava 2022 Latest News: आज बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणातून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानांचा दाखला देत शहाजीबापू पाटलांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

बाळासाहेब ठाकरे मैद्याचं पोतं कुणाला म्हणायचे? असं विचारत उपस्थित प्रेक्षकांना शरद पवारांचं नाव मोठ्या घेण्यासही शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं. यावेळी शहाजीबापू पाटील आपल्या भाषणात म्हणाले, “गुलाबराव मी काँग्रेसमध्ये होतो. तरीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची दसरा मेळाव्याची सभा टीव्हीवर कायम ऐकायचो. तुम्हीही ऐकत असाल. हिंदुहृदयसम्राट मैद्याचं पोतं कुणाला म्हणाले? शरद पवार… मोठ्याने नाव घ्या घाबरू नका. बारामतीचा म्हमद्या कोणाला म्हणाले? शरद पवार… दाऊदचा हस्तक कोणाला म्हणाले? शरद पवार… ही इलायती सोनिया गांधी मला चालणार नाही, कोण म्हणाले, तर हिंदुहृदयसम्राट म्हणाले” अशा शब्दांत शहाजीबापू पाटलांनी शरद पवारांवर टीकास्र सोडलं आहे.

DCM Devendra Fadnavis On Congress
“मोदी हे महायुतीचं इंजिन, तर राहुल गांधींच्या ट्रेनचं…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा
Ranajagjitsinha Patil ajit pawar malhar patil
“२०१९ मध्ये अजित पवारांनीच आम्हाला भाजपात पाठवलं अन्…”, राणाजगजीतसिंह पाटलांच्या मुलाचा मोठा गौप्यस्फोट
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा, पाहा LIVE

दरम्यान, शहाजीबापू पाटलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीकास्र सोडलं आहे. माझ्या मनात एक इच्छा आहे. तुमच्याकडे कुणाकडे फोन असेल तर त्यांनी त्या उद्धव ठाकरेला फोन करा आणि दोन मिनिटे इथं येऊन हे बघून जा म्हणावं. मग खरी शिवसेना कुठली हे कळेल, असं विधान केलं आहे.

मेलेल्या कुत्र्यासारखं फरफटत नेलं- शहाजीबापू पाटील
एखाद्या मेलेल्या कुत्र्याला फरफटत नेऊन उकिरड्यावर टाकतात, तसं तुम्ही सगळ्या आमदारांना फरफटत नेलं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उकिरड्यावर आम्हाला फेकून दिलं. हे उद्धव ठाकरेंनी केलेलं पाप आहे. ते पाप खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंनी धुतलं. एकनाथ शिंदेंनी गद्दारी केलेली नाही. झालेल्या चुकीचं प्रायश्चित करण्यासाठी धाडसाने उचलेलं एक पाऊल आहे. हे पाऊल महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नसतं, तर महाराष्ट्रात ४०-४५ मेळावे झाले नसते.