तीन महिने थंडी अनुभवल्यानंतर आता मुंबईकरांना उकाडय़ाला सामोरे जावे लागणार आहे. दिवसा तापमानात दोन ते तीन अंश से.ने वाढ होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
कोणतीही हवामानप्रणाली कार्यरत नसल्याने देशाच्या उत्तर भागात आकाश निरभ्र आहे. थेट सूर्यप्रकाशामुळे उत्तर व वायव्य भागासह मध्य प्रदेशमधील तापमान वाढले आहे. दिल्लीतील कमाल तापमान ३१ अंश से.पर्यंत जात असून रात्री मात्र त्यामानाने थंड आहे. तेथे रात्रीचे तापमान १३ अंश से.पर्यंत खाली जात आहे. हिवाळ्यातील वाऱ्यांची दिशा अजूनही बदलली नसून मुंबईसह राज्यात पूर्व- उत्तरेकडून वारे येत आहेत. मात्र उत्तरेतील तापमान वाढले असल्याने तसेच आकाशही फारसे ढगाळ नसल्याने शहरातील तापमान काहीसे वाढले आहे. गुरुवारी मुंबईत कमाल ३० अंश से. तर किमान १९ अंश से. तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसांत या तापमानात दोन ते तीन अंश से.ने वाढ होण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2016 रोजी प्रकाशित
तापमानात वाढ होण्याचा अंदाज
तीन महिने थंडी अनुभवल्यानंतर आता मुंबईकरांना उकाडय़ाला सामोरे जावे लागणार आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-02-2016 at 03:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperatures expected to rise