मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी (४ फेब्रुवारी) महापालिका मुख्यालायता सादर केला जाणार आहे. प्रशासकीय राजवटीतला हा अर्थसंकल्प कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर होतो आहे त्यामुळे काय घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हा अर्थसंकल्प सादर करतील. त्याआधी त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. लोकशाही संपवण्याचा पाया रचला जातो असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?

दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांप्रमाणे यावेळीही मुंबई महापालिकेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून आणि नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. एक मुंबईकर या नात्याने ज्यांच्यासाठी हे शहर जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, मी या शहराचे निहित स्वार्थापासून रक्षण करण्यासाठी जे माझ्याकडून करता येईल ते करेन.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The foundation is being laid to end democracy aditya thackeray letter to commissioner scj
First published on: 03-02-2023 at 19:56 IST