मुंबई : आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी मंत्रालयातील वित्त विभागात नेहमीप्रमाणे गर्दी उसळली नव्हती, मात्र देयकांसाठी विविध विभागांची लगबग सुरू होती. २५ हजार कोटींपेक्षा अधिक निधी ‘बिम्स’ या प्रणालीद्वारे वितरित झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. मंत्रालयात दरवर्षीच आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी देयके वा निधीकरिता गर्दी होत असते. काही वर्षांपूर्वी तर वित्त विभागासमोर उभे राहायलाही जागा नव्हती एवढी गर्दी झाली होती. त्या तुलनेत शुक्रवारी शेवटच्या दिवशी वित्त विभागात गर्दी नव्हती. पण शासकीय ठेकेदार तसेच विविध खात्यांची देयके मंजूर करून निधी मिळविण्याकरिता लगीनघाई सुरू होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी आर्थिक तरतूद केलेली असते. त्या तरतुदीला अनुसरून आर्थिक वर्षांत वित्त विभाग हा निधी खर्च करण्यास मान्यता देत असतो. एखाद्या लेखाशिर्षांखाली तरतूद केलेला निधी त्या आर्थिक वर्षांत खर्च करावा लागतो, अन्यथा तो अखर्चित निधी म्हणून तिजोरीत वर्ग केला जातो. हे टाळण्यासाठी मार्च महिन्यात मोठय़ा प्रमाणात विविध विभागांत निधीचे वाटप केले जाते. आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवसापर्यंत निधीसाठी वाट पाहू नये, असा आदेश वित्त विभागाकडून दिला जातो. पण शेवटच्या दिवशीच देयकांकरिता झुंबड उडते. यंदाही निधीसाठी धावपळ सुरू होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The ministry is busy payments despite the last day of the financial year ysh
First published on: 01-04-2023 at 00:02 IST