कोल्हापूर आणि खारघरच्या धर्तीवर मुंबईतून ये-जा करणाऱ्या एम.एच. ०४ या नोंदणी झालेल्या छोटय़ा वाहनांना टोलमधून सवलत द्यावी, अशी मागणी भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (एम.एच.-०४) नोंदणी झालेल्या वाहनांना टोलमधून वगळावे, अशी मागणी केळकर यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडे केली आहे. कोल्हापूरमध्ये स्थानिक वाहनांना टोल लागू केला जात नाही. खारघरमध्ये छोटय़ा वाहनांना सवलत देण्यापूर्वी पनवेल आणि पेणमध्ये नोंदणी झालेल्या वाहनांना सवलत दिली गेली होती.