Premium

राज्यात लवकरच १३ हजार मेगावॉट वीजनिर्मिती; उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी ७१ हजार कोटींची गुंतवणूक

अपांरपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात हे करार असून एवढी गुंतवणूक अन्य कुठल्याही राज्यात आलेली नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

What Devendra Fadnavis Said?
सत्तासंघर्षाच्या निकालाच्या आधी राष्ट्रवादीसह प्लान बी तयार होता का? काय म्हणाले फडणवीस?

; ३० हजार रोजगार निर्मिती; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई:  राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने येत्या काळात १३ हजार ५० मेगावॉट विजेच्या निर्मितीबाबत नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचपीसी) तसेच टोरंट पॉवर लिमिटेड या दोन कंपन्यांशी सोमवारी सामंजस्य करार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दोन्ही कंपन्या उदंचन (पिम्पग स्टोरेज) जलविद्युत प्रकल्प उभारणीच्या माध्यमातून राज्यात तब्बल ७१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून ३० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच शेती, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी या कराराचा फायदा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 03:11 IST
Next Story
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण