मुंबई : निरोगी आयुष्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आणि आदिवासी तसेच दुर्गम भागातील युवकांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘एचएसएनसी’ विद्यापीठाच्या फीट भारत क्लबतर्फे ‘केंद्र ते किनारा’ अशी दिल्ली ते मुंबई दरम्यान तब्बल १ हजार ४१५ किलोमीटरची सायकलवारी करण्यात येणार आहेत.

ही सायकलवारी दिल्लीतील इंडिया गेट येथून १८ जानेवारी रोजी सुरू होत असून पुढे पावटा, अजमेर, गंगापूर, रतनपूर, वडोदरा, सुरत, पालघर अशी मार्गक्रमण करीत या सायकलवारीचा २६ जानेवारी रोजी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे समारोप होणार आहे. तसेच यानिमित्त वरळीतील ‘एचएसएनसी’ विद्यापीठात समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संपूर्ण मोहिमेत ११ विद्यार्थी आणि १ शिक्षक समन्वयक सहभागी होणार आहे.

Sewri-Worli elevated road work will be speed up
शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम घेणार वेग
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Navi Mumbai Metro update Belapur Pendhar line Metro speed
नवी मुंबई मेट्रो सुसाट, लवकरच बेलापूर-पेणधर मेट्रोची ताशी ६० प्रति किलोमीटर वेगाने धाव
Alternative roads for light vehicles on Kalyan Shilphata road from Friday
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर शुक्रवारपासून हलक्या वाहनांसाठी पर्यायी रस्ते; जड, अवजड वाहनांच्या वाहतुकीला चार ठिकाणी बंदी
maharashtra government guarantee for loan of rs 12000 crore to mmrda
एमएमआरडीएच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना अर्थबळ; १२ हजार कोटींच्या कर्जासाठी राज्य सरकारची हमी
ST hiked passenger fares by around 15 percent now avdel tethe Pravas pass fares also increased from 45 to 66 percent
‘एसटी’च्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेला प्रवासी मिळणार कसे?.. पासच्या किमती…
thane creek bridge 3 loksatta news
ठाणे खाडी पूल ३ : दक्षिणेकडील मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात, फेब्रुवारीअखेरीस मार्गिका वाहतूक सेवेत
mahakumbh 2025
Maha Kumbh 2025 : पवित्र कुंभस्नानासाठी ४८ लाख भाविकांचा ट्रेनने प्रवास, मौनी अमवास्येकरता रेल्वेकडून खास नियोजन!

हेही वाचा…खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार, परिवहन मंत्री

या मोहिमेचे नेतृत्व करणारे आणि फीट भारत क्लबचे शिक्षक समन्वयक मयूर दुमासिया हे दिव्यांग आहेत. आठ दिवसांच्या या मोहिमेत दररोज १९५ किलोमीटर प्रवास सायकलने करण्यात येणार आहे, तसेच या प्रवासादरम्यान माती आणि बियांचे मिश्रण असलेले गोळे पेरले जातील आणि आदिवासी बांधवांचीही भेट घेऊन त्यांच्याशी शिक्षणासंदर्भात संवाद साधण्यात येणार आहे. ‘एचएसएनसी’ विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. हेमलता बागला यांनी या मोहिमेसाठी विशेष सहकार्य केले आहे.

Story img Loader