दिवाळीची सुटी संपल्यामुळे मुंबईकडे माघारी निघालेल्या प्रवाशांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड येथे सुटी घालवण्यासाठी गेलेले नागरिक आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. परंतु अचानक गर्दी वाढल्यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी सुटण्यास वेळ लागत आहे. वडखळ ते धरमतर दरम्यान वाहनाच्या लांब रांगा लागल्या आहेत. रायगड-पेण-अलिबाग मार्गावरही देखील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Story img Loader