शिवसेनेतील अतभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक पातळीवर संघर्षाचा सामना करावा लागला. दरम्यानच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – शिंदे गटाला धक्का! शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हायकोर्टाकडून परवानगी

Ramdev Baba
“आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार”, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
Dombivali K V Pendharkar College Sports Complex Inaugurated Retired Justice Hemant Gokhale
ऑलिम्पिकमध्ये झळकण्यासाठी क्रीडासंकुलांची गरज, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे प्रतिपादन

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“विजयादशमीच्या दिवशी जो मेळावा होणार आहे. त्यासाठी आपल्याला विजय मिळाला आहे. न्यायदेवतेवर जो आपला विश्वास होता. तो सार्थकी ठरला आहे. मी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की, दसरा मेळाव्याला उत्साहात, शिस्तीने या, आनंदाला गालबोट लागेल, असं कोणतेही कृत्य होऊ देऊ नका. इतर काय करतील माहिती नाही. या मेळाव्याकडे जगाचे लक्ष लागले आहे,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – Dussehra Melava: उद्धव ठाकरे उभे राहतील तेव्हाच एकनाथ शिंदेही भाषण करणार? शिंदे गट म्हणतो “भाषणाची वेळ…”

“न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याची परवानगी राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी ते पाडतील, असा मला विश्वास आहे. आजच्या निकालाप्रमाणेच येत्या काही दिवसांत येणारा सर्वोच्च न्यायालयातच्या निकालातूनही आम्हाला न्याय मिळेल. कारण हा निकालही देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा निकाल असेल,” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.