सामाजिक परिवर्तन चळवळीतील तरुणांना प्रोत्साहन आवश्यक

मुंबई : सामाजिक परिवर्तन चळवळीतील तरुणांना प्रोत्साहन आवश्यक असल्याचे नमूद करीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी विरोधी मतांचेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शनिवारी केले. सध्याच्या राजकारणात प्रतिभावान तरुणांचा सहभाग कमी होत असला तरी त्यांना अपेक्षित आदर्शवाद याच चळवळीतून पुढे येईल. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अशा तरुणांचे योगदान महत्वाचे आहे, असे यादव म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा शनिवारी मुंबईत रंगला. या सोहळय़ात विविध क्षेत्रांतील १७ प्रज्ञावंतांना भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरविण्यात आले. जागतिक पातळीवर पर्यावरण क्षेत्रातील देशाची कामगिरी, सौर किंवा अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात देशाने गाठलेली उंची, तरुणांच्या सामाजिक चळवळी आणि राज्यातील राजकीय परिस्थिती अशा विविधांगी मुद्दय़ांवर यादव यांनी यावेळी मनमोकळेपणे भाष्य केले. ‘‘प्राचीन पतंजली योग सूत्रातून जीवनमूल्ये आणि तत्त्वे यांचे बहुमोल मार्गदर्शन होते. भारतीय जीवनशैली ही केवळ जगण्याचा नव्हे, तर मानवी मनाचाही विचार करते’’, असे यादव यांनी नमूद केले. जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने भारताने दिलेली अभिवचने वेळेआधीच पूर्ण होतील. सौर किंवा अपारंपारिक ऊर्जा निर्मिती २०३० पर्यंत ५० टक्क्यांचे उद्दिष्ट निश्चितच साध्य करेल, असा विश्वासही यादव यांनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister bhupendra yadav in mumbai for loksatta tarun tejankit event zws
First published on: 26-03-2023 at 03:32 IST