मुंबई : मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांची तहान भागविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या सूर्या प्रादेशिक प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून मार्चमध्ये हा टप्पा कार्यान्वित होणार आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास वसई-विरार पालिका क्षेत्राला १८५ एमएलडी क्षमतेने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईने हैराण झालेल्या वसई-विरारकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एमएमआरडीएकडून  सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे काम २०१७ पासून सुरू असून त्यासाठी  १३२५.७८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाअंतर्गत ४०३ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहे. काम सुरु झाल्यापासून ३४ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी विलंब झाल्याने हा प्रकल्प लांबला. मागील काही माहिन्यांपासून महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या निर्देशानुसार कामाचा वेग वाढविण्यात आला. त्यानुसार दोन्ही टप्प्याचे काम वेगात सुरू असून आजच्या घडीला एकूण प्रकल्पाचे ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याचे एकूण ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे.  प्रकल्पातील इनटेक स्ट्रक्चरचे ९८ टक्के  आणि जलशुद्धीकरण केंद्राचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
Kia vehicles will be expensive from April 1
‘किआ’ची वाहने १ एप्रिलपासून महागणार

हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकातील लोकल वेळ दर्शक सव्वा तास बंद

या प्रकल्पाअंतर्गत एकूण ८८ किलोमीटरची जलवाहिनी टाकली जात आहे. तसेच मेंढवणखिंडीत बोगदा बांधण्यात आला आहे. तुंगारेश्वर बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे.  मार्चमध्ये वसई-विरारला पाणी पुरवठा करणारा पहिला टप्पा कार्यान्वित केला जाईल अशी माहिती श्रीनिवास यांनी दिली.  दुसरा टप्पाही पुढील काही महिन्यात पूर्ण करुन तोही कार्यान्वित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. पहिला टप्पा सुरु झाल्यास वसई-विरार क्षेत्राला तर दुसरा टप्पा कार्यान्वित झाल्यास मीरा-भाईंदर क्षेत्राला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.