मुंबई : मुंबईत २४ ते २७ मेदरम्यान चार तासांसाठी पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. या काळात पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या परिरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. २४ ते २७ मेदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे काम चालणार आहे. याच वेळेत पाच टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. ए, बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस आणि टी विभागात ही पाणीकपात असणार आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ‘एन’ आणि ‘एस’ विभागातील पूर्वेकडील भाग,  संपूर्ण टी, एम पूर्व आणि एम पश्चिम  विभाग,  एल विभागातील पूर्वेकडील भाग, बी, ई, एफ उत्तर, एफ दक्षिण आणि ए विभागाच्या पाणीपुरवठय़ामध्ये पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.  या पार्श्वभूमीवर या विभागातील  नागरिकांनी या कालावधीत पाणी जपून वापरावे. पाणीकपातीपूर्वी एक दिवस आधी पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेकडून  करण्यात आले आहे.

Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
uran revas marathi news, karanja to revas ro ro service marathi news
उरण: करंजा-रेवस रो रो जलसेवेचे काम पुन्हा लांबणीवर
cyber police helpline saves rs 50 crore of mumbaikars
सायबरगुन्हे हेल्पलाइनद्वारे ५० कोटी वाचवण्यात यश