विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. यावेळी शिवसेना आमदार आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार आमनेसामने आले आहेत. मात्र, त्याआधीच विधीमंडळातील शिवसेनेचे पक्ष कार्यालयाला टाळे लावण्यात आले आहे. यावर शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना लिहिण्यात आली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

“विधीमंडळाचे कार्यालय आम्हीच बंद केले आहे. कारण परत मोठ्या ताकदीने सभागृहात यायचे आहे. शिवसेनेचाच व्हीप अधिकृत आणि महत्त्वाचा आहे. कार्यालयाची चावी आमच्याकडेच आहे. काही लोकांना दुसरीकडे बंद करुन ठेवले होते आमच्या कार्यालयाबद्दल काय विचारता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

“कसाबलाही असं आणलं नसेल”; शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरेंचा टोला

दरम्यान, मोठ्या पोलीस बंदोबस्तात बसमधून शिवसेना बंडखोर आमदार हे विधान भवनात दाखल झाले आहेत. यावेळी या आमदारांसोबत भाजपाचे आमदार देखील होते. याबाबत माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे.

“बसमधून इथे आणलेल्या आमदारांबद्दल मला वाईट वाटत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कसाबच्या वेळीदेखील इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. कसाबलाही असं आणलं नसेल. कोणी पळणार आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. तसेच शिवसेनेचंच व्हीप अधिकृत आहे असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.