मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यात सतत चढ- उतार होत आहे. परिणामी, उकाड्यात वाढ झाली. दरम्यान, पुढील एक – दोन दिवस मुंबईतील उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबईत जानेवारीच्या सुरुवातीपासून तापमानात चढ – उतार होत आहेत. पहिल्या आठवड्यात बहुतांश वेळा कमाल तापामानाचा पारा ३५ अंशावर होता. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानाच्या पाऱ्यात घट झाल्याने रात्रीच्या उकाड्यात वाढ झाली होती. काही वेळेस दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या आसपास राहिल्याने किंचित दिलासा मिळाला होता. दरम्यान, पुन्हा किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गारवा जाणवत नाही, तसेच दुपारी उन्हाचा चटका लागतो. मुंबईत शनिवारी दिवसभर उकाडा सहन कारावा लागला. पहाटे गारवा नसल्यामुळे त्यात आणखी भर पडली.

Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
weather department predicts rising temperatures in Mumbai with increased afternoon heat expected
मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता
India Climate Change Inflation Agriculture Farmers
व्यवसायाभिमुख पिके हवीत!
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
Fire at mahakumbh
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण अग्नीतांडव; १५ टेन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी!

दरम्यान, उत्तर भारतातून कमी झालेले थंड वाऱ्याचे प्रवाह आणि ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३२.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी काही अंशानी कमाल तापमान अधिक नोंदले गेले.

उत्तर भारतातही थंडीचा जोर कमी झाला आहे. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी – अधिक होत आहे. दरम्यान, जानेवारीत मुंबईत थंडी तुलनेने कमी होती. डिसेंबरमध्ये काही प्रमाणात थंडीचा जोर होता. मात्र, जानेवारी महिन्यात किमान आणि कमाल तापमानातही सातत्याने बदल होत असल्याने पहाटे फारसा गारवा जाणवला नाही. याऊलट असह्य उकाडा सहन करावा लागला.

Story img Loader