जेवणात मीठ कमी पडल्याने तरुणाने पत्नीची रस्त्यात हत्या केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री भेंडीबाजार परिसरात, मोहम्मद अली मार्गावर घडला.

अब्दुल रेहमान शेख असे आरोपीचे नाव असून तो पत्नी नुसरतबरोबर भेंडीबाजार परिसरात वास्तव्यास होता. मिठावरून अब्दुलने वाद घातला आणि नुसरतला मारहाण सुरू केली. तावडीतून निसटलेल्या नुसरतचा अब्दुलने पाठलाग केला. पुन्हा पकडून अब्दुलने तिचे कपाळ रस्त्यावरील उंच दुभाजकावर आपटले. त्यात नुसरतचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.