अटलबहादूर सिंग यांचे भावोद्गार

mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Suicide attempt of college girl due to harassment incident in Bharti University campus
छेडछाडीमुळे महाविद्यालयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, भारती विद्यापीठ परिसरातील घटना
pune, Governor Ramesh Bais, Universities, Enhance Quality, Innovation, Compete, Globally,
‘… अन्यथा विद्यापीठे, महाविद्यालये मागे पडतील’; राज्यपाल रमेश बैस यांचा इशारा

शहरात रक्ताची एकही व्यक्ती नाही, विद्यापीठात एकही शिख मतदार नाही. परंतु सिनेट सलग २१ वर्षे निवडून आलो. नागपूरकरांनी भरभरून प्रेम दिले आणि सेवा करण्याची संधी दिली. आज माझे बाबा जिवंत असते, तर त्यांना आपल्या मुलांचा अभिमान वाटला असता. ते जरी हयातीत नसलेतरी नागपूरकरच माझे माय-बाप आणि बंधू आहेत, असे भावपूर्ण उद्गार माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांनी काढले.

एकेकाळी महापालिकेत ‘किंग मेकर’ची भूमिका बजावणारे अटलबहादूर सिंग यांची दिलेला शब्द पाळणारा आणि जात-धर्माच्या पलीकडचा दिलदार माणूस अशीच ओळख आहे. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील सर्वपक्षीय मंडळींनी त्याच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम गुरुवारी शंकरनगरातील साई सभागृहात घेतला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, माजी खासदार विजय दर्डा, आमदार अनिल सोले, माजी महापौर कुंदाताई विजयकर, मोहब्बतसिंग तुली हे व्यासपीठावर होते.  मराठी भाषा शिकण्यासाठी शिकवणी लावल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. एका शिक्षकाकडे मराठी भाषेची शिकवणी लावली. त्यावेळी महिन्याला ३० रुपये याप्रमाणे शुल्क होते. महिन्याच्या शेवटी ३० रुपये दिल्यावर त्या शिक्षकांनी १६ रुपये परत केले. असे त्यांनी का केले असे विचारले तेव्हा ते म्हणाले. तू केवळ १४ दिवस शिकवणीला आला. असे शिक्षक मिळाले. त्यामुळेच मी घडू शकलो. नागपूर हे देशातील सर्वात सुंदर शहर असून येथील लोकही तेवढेच मनमिळावू आहेत. त्यामुळे नागपूर शहर सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले. अटलबहादूर सिंग यांच्याकडे माणसे जोडण्याची कला आहे. त्यांची प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य अशा सर्व क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्यामुळेच नागपुरात गानसम्रागी लता मंगेशकर यांचा सत्कार होऊ शकला. लता मंगेशकर यांनी नागपुरात येण्यास नकार दिला होता. कुंदाताईंना महापौर करण्यासाठी झालेल्या तडजोडीचा उल्लेखदेखील गडकरी यांनी केला. यावेळी प्रा. जोगेंद्र कवाडे, सतीश चतुर्वेदी, विजय दर्डा यांची भाषणे झाली. संचालन नितीन राऊत यांनी केले. कुंदाताई विजयकर यांनी आभार मानले.

विद्यापीठाची पदवी मराठी, इंग्रजीत

तत्कालीन कुलगुरू भाऊसाहेब कोलते यांच्या काळात नागपूर विद्यापीठाची पदवी मराठी आणि इंग्रजीत देण्यास सुरुवात झाली आहे. याबद्दल सांगताना अटलबहादूर सिंग म्हणाले, मी आणि मोहब्बतसिंग तुली यांनी पदवी मराठी भाषेत देण्याची मागणी केली होती. त्यावर कोलते यांनी मराठी भाषेतून पदवी दिल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचण होईल, असे सांगितले. परंतु आमचा आग्रह पाहून त्यांनी मराठी आणि इंग्रजीत पदवी देण्याचा मार्ग काढला.