नागपूर :महाविकास आघाडी सरकारचे नेते कोणतीही बाब केंद्र सरकारवर ढकलत आहेत. त्यांना जबाबदारी झटकण्याची सवय झाली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.  कोणी कितीही रणनीती तयार केली तरी २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल यात शंका नाही, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून  चर्चा सुरू आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०२४ नंतर देशात तिसऱ्यांदा भाजपचे सरकारचे येईल.  तसेच नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या पत्रकाची सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली.