विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगरांना आरक्षण देण्याचे लिखित आश्वासन देऊन सत्तेत आल्यावर एक वर्ष झाल्यानंतरही त्याची पूर्तता न करणाऱ्या युती सरकारने समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. या अधिवेशनात या मुद्याचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ८ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा नेण्यात येणार असून यात राज्यभरातील लाखो समाजबांधव सहभागी होणार आहे. जर सरकारने मागणी मान्य केली नाही तर ते रस्त्यावरच तळ ठोकतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.