नागपूरच्या श्रीरामनगर भागात कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. वडिलांवर लाकडाने वार करत राहत्या घरी ही हत्या करण्यात आली आहे. घयाडी कुटुंबात झालेल्या वादातून ही घटना घडली.
गुरुवारी रात्री क्षुल्लक कारणातून वडिलांसोबत संशयित आरोपी मुलाचे भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या रागात मुलाने शेजारी असलेला लाकडाच्या तुकड्याने वार करत वडिलांची हत्या केली. पोलिसांनी आरोपी मुलगा रागीट स्वभावाचा असल्यानं ही हत्या झाल्याचे सांगितले आहे. वडिलांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. या दोघांमध्ये कोणत्या कारणावरून भांडण झाले याचा पोलीस करत आहेत.