विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपचा दुपट्टा घालून सहभाग

नागपूर : विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात भाजपच्या प्रचार यात्रेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी सहभागी झाल्याची तक्रार

ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
bhavana gawali
“भावना गवळी यांना उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनामे देणार,” शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा
amravati loksabha constituency
अमरावतीत बच्चू कडूंचा ‘प्रहार’; नवनीत राणांविरोधात ठाकरे गटाच्या नेत्याला दिली उमेदवारी
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच; ‘इतके’ दिवस तुरुंगात राहावं लागणार

निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. याप्रकरणी डॉ. खटी यांना निवडणूक अधिकारी व जिल्हाधीकारी रवींद्र ठाकरे यांनी ‘क्लिन चिट’ दिली आहे. फडणवीस हे दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारार्थ नरेंद्रनगर भागातातील प्रभाग क्रमांक ३५ मध्ये सकाळी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महापौर संदीप जोशी, प्रकाश भोयर यांच्यासह डॉ. नीरज खटी दिसून आले. रॅलीमध्ये डॉ. खटी हेसुद्धा भाजपचा दुपट्टा घालून दिसून आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. शासकीय अधिकाऱ्यांना निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होता येत नाही. असे झाल्यास तो आचारसंहितचे भंग ठरतो. असे असतानाही डॉ. नीरज खटींसारखे विद्यापीठाचे महत्त्वाचे अधिकारी चक्क माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार यात्रेत दिसून आल्याने याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र, डॉ. खटी यांच्याकडून आचारसंहितेचा भंग न झाल्याचे सांगत निवडणूक आयोगाने त्यांना ‘क्लिन चिट’ दिली आहे.

सेवाशर्तीचा भंग करूनही कारवाई नाही

डॉ. खटी यांनी निवडणूक प्रचार यात्रेमध्ये सहभागी होत विद्यापीठाच्या सेवाशर्तीचा भंग केला होता. डॉ. खटी हे विद्यापीठाचे कर्मचारी असल्याने त्यांची अंतर्गत चौकशी करून विद्यापीठाच्या सेवाशर्तीचा भंग केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, कुलगुरू डॉ. काणे यांनी खटींवर मेहरनजर ठेवत हे प्रकरण निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोपवून खटींचा बचाव केल्याचे आता बोलले जात आहे.