कुंकू पुसणे, मंगळसूत्र काढून ठेवणे घटस्फोटाची कारणे होऊ शकत नाही; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!
orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…

एकविसाव्या शतकात लग्नानंतर महिलांनी डोक्यावर पदर घ्यावा, अशी अपेक्षा करता येऊ शकत नाही. त्याशिवाय कपाळावरचे कुंकू पुसणे किंवा मंगळसूत्र काढून ठेवल्याने महिला क्रूर असल्याचे सिद्ध होत नसून ते घटस्फोटाचे कारण ठरू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कौटुंबिक खटल्यात नोंदविले आहे. हा निकाल पुरुषप्रधान संस्कृतीला मोठी चपराक देणारा आहे.

नागपूरकर अनुराग आणि कामठी येथील रहिवासी सरिता (नावे बदललेली) २१ जून १९९५ ला विवाह झाला. त्यानंतर चौदा महिन्यांनी त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर त्याने नोकरी सोडली आणि स्वत:चा व्यवसाय थाटण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता तो सरिताला तिच्या माहेरून दीड लाख रुपये  घेऊन येण्यासाठी दबाव टाकत होता. माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने तिचा छळ केला. २ ऑक्टोबर २००० मध्ये त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि त्याने हात धरून तिला घराबाहेर काढले. त्या दिवशी रात्री २ वाजेपर्यंत ती घराबाहेर रस्त्यावर उभी होती. परंतु अनुराग तिला परत घ्यायला आला नाही. तिने त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. परंतु तेही तिच्या मदतीला आले नाही. शेवटी ती बहीण व जावयाच्या मदतीने माहेरी परतली. त्यानंतर तिने सासरी परतण्याचा प्रयत्न केला असता तिला घरात प्रवेश देण्यात आला नाही.

दरम्यान, अनुरागने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. ही याचिका कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली. त्याविरुद्ध  उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपिलावर न्या. वासंती नाईक आणि न्या. विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अनुरागने सरिता ही घरात डोक्यावर पदर घेत नाही, कपाळाचे कुंकू पुसून टाकते आणि मंगळसूत्रही काढून ठेवते. तिचे हे वागणे अतिशय क्रूर असून तिला हटकले असता तिने नवऱ्याचे घर सोडले आणि कधीच परतली नाही, असे आरोप केले. मात्र, नवऱ्याने केलेल्या आरोपांच्या आधारावर घटस्फोट देता येऊ शकत नाही. शिवाय नवऱ्यानेच तिला घराबाहेर हाकलून लावले, असे तिने सिद्ध केले असल्याचे मत नोंदवित न्यायालयाने अनुरागला घटस्फोट नाकारला.