scorecardresearch

Premium

वन्य प्राण्यांपासून बचावासाठी शेतीच्या कुंपणात सोडलेल्या जिवंत विद्युत प्रवाहामुळे वर्षभरात १३ नागरिकांनी गमावला जीव

१२ शेतकऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13 civilians lost their lives electric currents farm fences
वन्य प्राण्यांपासून बचावासाठी शेतीच्या कुंपणात सोडलेल्या जिवंत विद्युत प्रवाहामुळे वर्षभरात १३ नागरिकांनी गमावला जीव

चंद्रपूर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीचे संरक्षण करण्यासाठी कुंपणात अवैध विद्युत प्रवाह साेडल्यामुळे २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १२ शेतकऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्हयात शेतकऱ्यांमार्फत जंगली प्राण्यांपासून शेती व पिक चे संरक्षणार्थं शेती कुपणास अवैध विद्युत तारेची जोडणी करुन विद्युत प्रवाह सोडल्यामुळे अनेक शेतकरी, गुराखी आणि प्रसंगी स्वतः शेत मालकास विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. चंद्रपूर जिल्हयात २०२२ ते माहे ऑगष्ट २०२३ या कालावधीत शेत मालकाच्या अवैध विद्युत प्रवाह हलगर्जीपणा, गैरवापरामुळे एकुण १३ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

nashik eco friendly ganesh visarjan, nashik ganesh visarjan, nashik ganesh visarjan miravnuk, ganesh visarjan artificial lakes nashik
नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी तयारी, कृत्रिम तलावांची व्यवस्था, पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यास कारवाई
animal lovers
जखमी प्राण्यांसाठी ‘प्यार’
kutuhal sea fish
कुतूहल : समुद्रगायी संवर्धन प्रवास
farmer
वसईचे शेतकरी ‘किसान’ नाहीत!; महापालिका क्षेत्रामुळे अनेक योजनांपासून वंचित

हेही वाचा… गोंडवाना विद्यापीठाचा निकाल धक्कादायक! ७४ हजार विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण

याप्रकरणी संबंधित विद्युत प्रवाह सोडणाऱ्या शेत मालकांविरुध्द कलम “सदोष मनुष्य वध” गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन ज्यात आजन्म कारावासाची सुध्दा शिक्षा होवु शकते. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुध्दा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जंगली प्राण्यापासुन शेती व पिकाची सुरक्षिततेकरीता शेती कुंपणाला विद्युत प्रवाह तार जोडुन जिवंत विद्युत प्रवाह सोडु नये, अन्यथा संबंधीतांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी दिला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 13 civilians lost their lives during the year due to live electric currents left in farm fences to protect them from wild animals in chandrapur rsj 74 dvr

First published on: 23-09-2023 at 09:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×