नागपूर: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थितीत भर पडली असून दोन्ही देशांनी युद्धसज्जतेवर भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने स्वसंरक्षण सराव करण्याचे आदेश महाराष्ट्रसह २४४ जिल्ह्यांना दिले आहेत. नागरी संरक्षण जिल्ह्यात नागपूरचा समावेश नाही. या अर्थ नागपूर शहर शस्त्रू राष्ट्राच्या हल्लापासून सुरक्षित मानले जात आहे.
नागरिकांची संरक्षणसिद्धता वाढवण्यासाठी स्थानिक एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने रंगीत तालीम केल्या जाते. नागरी संरक्षण कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाला असे मॉक ड्रिल (स्वसंरक्षण सराव ) ७ मे रोजी आयोजित करण्याची सूचना राज्यांना केली आहे .गुप्तरचर यंत्रणांनी दिलेल्या माहिती आधारे औद्योगिक शहर, औद्योगिक वसाहती, प्रमुख उद्योग, राजकीय दृष्ट्या संवेदनशील शहरे, व्यापारीपेठा असलेले शहरांचा नागरी सरंक्षण जिल्ह्यात समावेश केला जातो. यापूर्वी २०१० ला केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरी सुरक्षा जिल्ह्याची यादी जाहीर केली होती.
त्यामध्ये नागपूरचा समावेश नव्हता. तसेच यावेळी देखील नागपूर शहराचा समावेश नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत. तसेच जिल्ह्याची यादी देखील पाठवली आहे. यामध्ये नागपूरचा समावेश नसलातरी तयारीचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी मॉक ड्रील आयोजित करू शकतात. त्यााठी एनडीआरएफ तयार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ही १६ शहर नागरी संरक्षण म्हणून समावेश आहे. यामध्ये पहिल्या कॅटेगिरीत मुंबई, उरण, तारापूर,दुसऱ्या कॅटेगरीत ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशोट, पिंपरी-चिंचवडआणि तिसऱ्या कॅटेगरीत औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. परंतु नागपूरचा समावेश नाही. नागपूर शहर शस्त्रू राष्ट्राच्या हल्ल्यापासून सुरक्षित मानल्या जात आहे.
नागरी संरक्षण आघाडीच्या आपत्कालीन सेवांना मदत करते, उदा. तीव्र हवामानाचा सामना करणे किंवा बेपत्ता लोकांचा शोध घेणे, युद्धाच्या वेळी लोकांना मदत करणे, सुरक्षित स्थळी हलवणे आदी कामे केली जातात.नागरी संरक्षणाचे उद्दिष्ट नागरिकांची जगण्याची आणि संरक्षणाची प्रक्रिया आणि मदत सेवा आणि रक्त, पाणी आणि अन्न यासारख्या महत्त्वाच्या वस्तूंच्या आपत्कालीन पुरवठ्याची व्यवस्था यांची ओळख करून देणे आहे.देशातील गुप्तचर यंत्रणा कोणत्या शहरात, कोणत्या प्रतिष्ठाने शस्त्रूचे लक्ष्य ठरू शकते. याची गोपनीय माहती आहे. त्या आधारावर उपाययोजना म्हणून संबंधित जिल्ह्यात नागरी संरक्षणची रंगीत तालिम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.