नागपूर : कोळशावर आधारित जुन्या विद्युत निर्मिती प्रकल्पांचा स्वच्छ ऊर्जेसाठी वापर केल्यास राज्याला पाच हजार ७०० कोटी रुपयांचा फायदा होईल, असा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. ‘क्लायमेट रिस्क होरायझन्स’ या संशोधन संस्थेच्या माध्यमातून केलेल्या नव्या विश्लेषणातून यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि सर्वाधिक खर्चिक अशा कोळसाधारित विद्युत निर्मिती प्रकल्पांचा वापर स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी केल्यास बऱ्याच लाभदायक बाबी होऊ शकतात. यामध्ये प्रकल्पाची जमीन आणि कोळसाधारित विद्युत निर्मितीच्या काही पायाभूत सुविधांचा वापर स्वच्छ ऊर्जानिर्मिती आणि ग्रिड स्थिरीकरण सेवांसाठी केल्यास पाच हजार ७०० कोटी रुपयांचा लाभ होऊ शकतो, असे या अभ्यासात म्हटले आहे. राज्यातील कोळसाधारित जुनी विद्युत निर्मिती केंद्रे बंद करणे आणि त्यांचा अन्य ऊर्जेसाठी वापर या कामातील खर्च आणि लाभ हे या अभ्यासाद्वारे आकडेवारीसह मांडले आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील ऑक्सफर्ड सस्टेनेबल फायनान्स ग्रुपच्या ट्रान्झिशन फायनान्स रिसर्चचे प्रमुख डॉ. गिरीश श्रीमली यांनी हा अभ्यास केला आहे. भुसावळ, चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा आणि नाशिक येथील कोळासाधारित जुन्या केंद्रांचे यामध्ये विश्लेषण केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5700 crore benefit state old coal based power plants study report on climate risk horizons ysh
First published on: 08-12-2022 at 00:02 IST