नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने बुधवारी शहरातील जगनाडे चौकात ‘जा रे मारबत…. विदर्भ वेगळा झाला पाहिजे’ अशा घोषणा देत कालबाह्य झालेल्या नागपूर कराराची होळी करण्यात आली.

२८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर करार करण्यात आला, या करारप्रमाणे विदर्भाला महाराष्ट्रात १ मे १९६० साली सहभागी करून घेतले, परंतु नागपूर कराराच्या ११ कलमापैकी बहुतांश कलमा पाळली गेली नाही. त्यामुळे शहरात आज टप्या टप्याने चार ठिकाणी कराराची होळी केली. या आंदोलनात पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदारसह विदर्भवादी नेते सहभागी झाले होते.