अकोला : ग्राम विकासाचा चेहरा म्हणून ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना’ येत्या १७ सप्टेंबरपासून राबवली जाणार आहे. सर्व योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या गावांना पारितोषिके दिली जातील. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ट रस्ते, स्वच्छता सुविधा, कार्यालये, शाळा, अंगणवाडी इमारती सुसज्ज असणार्या आणि इतर निकष पूर्ण करुन गावाचा विकास साधणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे दिली.

ग्रामविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्हा परिषदेमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, आ. अमोल मिटकरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यासह अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी ग्रामविकास मंत्र्यांनी १०० दिवसांच्या सातकलमी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संकेतस्थळाचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. ई-ऑफिस प्रणालीचा वापर करतानाच इंटरनेट सुविधेचा प्रश्न मार्गी लावावा. सर्वांसाठी घर योजनेत महाराष्ट्रात यंदा विक्रमी ३० लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. शासनाने जाहीर केल्यानुसार घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून दिली जाईल. शिबीर व सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गरजूला घरकूल मिळवून देण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्र्यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील जुन्या इमारतीत असलेल्या पंचायत समितीच्या नवीन इमारती पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन इमारती पूर्ण होतील. जि. प. च्या इमारतीसाठीही प्रयत्न केले जातील. बचत गटातील महिलांची उत्पादने सर्वदूर पोहोचावी यासाठी विपणनाचे भक्कम जाळे निर्माण करावे. ‘उमेद मॉल’ची निर्मिती करून या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी. ग्रामसमृद्ध योजनेत राज्य पातळी, विभागीय पातळी, जिल्हा पातळी व तालुका स्तरावर मोठ्या रकमेची बक्षीसे देण्यात येणार आहेत. त्यात सर्व गावांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्र्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे स्मारक होणार

राज्य शासनाने संत शिरोमणी सावता माळी यांच्या समाधी मंदिर व परिसराचा विकास करण्यासाठी शिखर समितीची मान्यता झाली असून, हे कार्य लवकरच पूर्ण होईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी (नायगाव, जि.सातारा) स्मारक उभारण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून हे काम गुणवत्तापूर्ण व गतीने होईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.