नागरिकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागपूर जिल्हयात ग्रंथोत्सवाचे आयोजन ‍डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात होणार असल्याने ग्रंथरसिकांना विविध कार्यक्रमाची पर्वणी मिळणार आहे. ग्रंथोत्सवात कवी संमेलनासोबत परिसवांदाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.‍ विपीन इटनकर यांनी सांगितले.

हेही वाचा- मतदार नोंदणीसाठी ‘युथ फेस्टीवल’; निवडणूक आयोगाचा उपक्रम

3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार

दरवर्षी होणा-या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रयत्न केले जातात. त्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाते. यंदा फुटाळा येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. त्यासोबतच प्रकाशक व विक्रेते यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  नागपूर विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा- शिकवणी वर्गात जाणारा तुमचा मुलगा सुरक्षित आहे का?

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी  वर्षासोबत शांताबाई शेळके, अण्णाभाऊ साठे, वसंत बापट, जी.ए. कुलकर्णी, कवी शंकर रमाणी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रंथोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.