बुलढाणा तालुक्यातील नांद्राकोळी हे गाव आज संध्याकाळी झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने चांगलेच हादरले. बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नांद्राकोळी येथील गणेश भागाजी जाधव (४५) व सुनीता गणेश जाधव (३७) या पती-पत्नीत आज, गुरुवारी किरकोळ वाद झाला. वादानंतर गणेश घराबाहेर पडला. यामुळे हा वाद मिटल्यासारखा वाटत असतानाच गणेश संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास घरी परतला आणि शिलाई मशीनवर काम करीत असलेल्या सुनीतावर त्याने वखराच्या अतिधारदार पासने वार केले. त्यातील वार गळ्यावर लागल्याने तिचा करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र देशमुख, बिट जमादार परमेश्वर राजपूत सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृताचा पुत्र विशाल जाधव याने घटनेची फिर्याद दिली.

हेही वाचा >>>Nashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट! दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित

The discussion that the constitution will be changed again after the BJP raised slogans in the Lok Sabha elections has spread unrest among the Dalit community
दलित समाजात अस्वस्थता; भाजपच्या ‘चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा
one dead in lightning strikes
बुलढाण्यात पुन्हा अवकाळीचे थैमान; वीज पडून एकाचा मृत्यू, घरावर झाड कोसळले
two youth beaten badly in pub
पबमध्ये नृत्य करणाऱ्या तरूणीला धक्का लागला अन् राडा झाला…  
Prakash Ambedkar Slams PM Modi
पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून १७ लाख कुटुंबांनी देश सोडला, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाने खळबळ

एखादी घटना किती वेगळी, दूरगामी परिणाम करणारी असते हे या घटनेने सिद्ध झाले. एका इसमाने क्षुल्लक कारणावरून आपल्या पत्नीची हत्या केली, त्याच्या विरुद्ध मुलाने तक्रार दिली, आता तो कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे. काही क्षणातच पुत्राने आई गमावली, बाप गजाआड झाला, असा भीषण अनुभव दुर्दैवी पुत्राच्या नशिबी आला आहे.