गोंदिया: मागील महिन्यात पारा घसरून थंडीचा जोर चढत चालला होता. आज, मंगळवारी पुन्हा आकाशात ढग जमले. पहाटे पावसाची रिपरिप देखील सुरू झाली होती.

नोव्हेंबर महिन्याच्या २८ तारखेला झालेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात १२०० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. आणि आता पुन्हा मध्यरात्री पासून आकाशात ढग जमल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. गोंदिया जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कधीही विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागा कडून वर्तवण्यात आली आहे.

insurance policy latest news
विमा कवच घेताय…मग हे महत्त्वाचे!
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
coastal road girl death loksatta
मुंबई : ‘कोस्टल रोड’ अपघातात तरुणीचा मृत्यू
governor c p radhakrishnan warns poor water quality in rivers like godavari threatens human life
गोदावरीसह काही नद्यांची अवस्था बिकट, राज्यपालांकडून चिंता
PSI from Pune commits suicide by hanging in Lonavala
पुण्यातील पीएसआयची लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
479 leprosy patients found in Raigad district
रायगड जिल्ह्यात ४७९ कुष्ठरोगी आढळले, आदिवासी बहुल तालुक्‍यात कुष्‍ठरूग्‍ण संख्‍या गंभीर
Nine years of delay in transferring health centers causes patient suffering due to controversy
आरोग्य केंद्रे हस्तांतरण वादाचा रुग्णांना फटका, केंद्रांच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
Satyendra Das
राम मंदिराचे मुख्य पूजारी सत्येंद्र दास यांची प्रकृती चिंताजनक; ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल

हेही वाचा… लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये मुंबई, पुण्यानंतर नागपूर तिसऱ्या स्थानावर

मध्यंतरी दिवाळीच्या दिवसात थंडीचा जोर वाढला होता व त्यानंतर सामान्य वातावरण होते. त्यानंतर २५ नोव्हेंबरपासून पुन्हा पारा घसरण्यास सुरुवात झाली व २८ नोव्हेंबर रोजी पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. शेतकऱ्यांनी शेतात धान कापून ठेवला होता. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात साचले. त्यात धान भिजला.

सर्वच स्तरातून नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरून पंचनामे देखील केले. जिल्ह्यात बाराशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यानंतर हळूवारपणे तापमानाचा पारा वाढू लागला होता. त्यातच मंगळवारी मध्यरात्री ला १ वाजता पासून पुन्हा आकाशात ढग दाटू लागले. पाण्याचे थेंब देखील पडू लागले होते. दिवस उजाळता आकाशात अवकाळी ढग दाटून आले आहेत. शेतकऱ्यांचे धान अद्यापही बांधात पडून आहे.

Story img Loader