लोकसत्ता टीम

वर्धा : लोकशक्तीतून गावाचा विकास करण्याचा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देऊन ठेवला. सर्व एकत्र आले तर गावाचा नावलौकिक वाढू शकतो, याचे हे उदाहरण. अपारंपरिक ऊर्जा हा आता परवलीचा शब्द ठरत आहे. सौर ऊर्जा त्यात महत्वाची म्हणून पंतप्रधान मोफत सूर्यघर ही योजना आली. केंद्राच्या या योजनेच्या अनुषंगाने मॉडेल सोलर व्हिलेज विद्युत विभागाने साकारण्याचे ठरवले. हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट( राठी) या गावाची निवड झाली.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
fully equipped tourist attraction in Gondia Vidarbha
नवेगावबांधमध्ये पर्यटकांसाठी सूसज्ज निवास व्यवस्था ; या आहेत सुविधा
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
Mumbai Local Train Shocking video Womans Obscene Dance
मुंबई लोकलमध्ये तरुणीने ओलांडली मर्यादा! अश्लील कृत्य पाहून प्रवासी संतापले; VIDEO व्हायरल
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
Shocking accident video five people crushed by young man learning to drive two in critical condition the incident was caught on cctv
बापरे! कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच जणांना चिरडले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Dhananjay Munde News
Dhananjay Munde : धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित, विचारताच म्हणाले; “मी राजीनामा….”

७० घरे व अवघी १८७ लोकसंख्या असलेल्या या गावात २८ टीनाची व कौलारू घरे पण आहेत. ही सर्व घरे आज सौर ऊर्जेत न्हावून निघाली आहे. औद्योगिक वसाहतीला खेटून असलेल्या या गावात विविध अडचणी. कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांनी चंग बांधला. बँक ऑफ बडोदाची मदत घेण्यात आली. नंतर अधिकारी वर्गाने गावात कार्यशाळा घेणे सूरू केले. सौर ऊर्जा किती फायद्याची व कसलाच धोका नसल्याची बाब गळी उतरविण्यात आली. मग लाभार्थी गावाकऱ्यांना थेट लाभ कसा मिळवून देता येइल यादृष्टीने प्रयत्न सूरू झाले. अवघ्या तीन महिन्यात सर्व काम पूर्णत्वास गेले. आणि चिचघाट हे विदर्भातील पहिले आदर्श सौरग्राम ठरले. हे गाव आता सौर ऊर्जेत उजळून निघणार. शंभर टक्के कार्य सौर उर्जेंवरच चालणार. मधात आर्थिक अनेक अडचणी आल्यात. पण त्या मार्गी लागल्यात.

आणखी वाचा-आमदार राजू कारेमोरेंच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात याचिका दाखल

आता जिल्ह्यातील अन्य गावे सौर ऊर्जामय करण्याचा मानस विद्युत विभागाने ठेवला आहे. चिचघाट ही सुरवात असल्याचे ते म्हणतात. खरं तर कौलारू व टीनाच्या झोपड्यात ही प्रणाली कशी अंमलात आणायची हा पेच होता. पण गावाकऱ्यांचा प्रतिसाद व उत्साह कामी आल्याने समस्या सुटल्या. लाभार्थी होण्यासाठी व्यक्तिगत आर्थिक योगदान आवश्यक असते. म्हणून ती बाब मोठी अडसर ठरली होती. पण त्यासाठी कर्ज मिळाले. शासनाच्या जन समर्थ या पोर्टल मार्फत सौर प्रकल्पसाठी आवश्यक अर्थसाहाय्य बँक ऑफ बडोदाने उपलब्ध करून देत अडचण दूर केली. म्हणून या सौर प्रकल्पास १०० टक्के आर्थिक सहकार्य लाभले, ही महत्वाची बाब असल्याचे विद्युत विभागाचे अधिकारी सांगतात. असे अडथळे पार करीत चिचघाट राठी हे विदर्भात अव्वल आले. या गावाची प्रेरणा अनेक गावांना मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केल्या जातो.

Story img Loader